फळपीक विम्यासाठी अर्ज सुरु l Application for fruit crop insurance started
आठ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांत विमा लागू पुणे : मृग बहरासाठी राज्याच्या २६ जिल्ह्यांमधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत एक लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास तसे घोषणापत्र द्यावे लागेल; अन्यथा विमाहप्ता परस्पर कापला जाणार आहे. fruit crop insuranceजिल्हानिहाय विमा कंपन्या अशा...
• नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, नागपूर जिल्हा : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (टोल फ्री क्रमांक १८००१०२४०८८, दूरध्वनी क्रमांक ०२२६८६२३००५)
• बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर जिल्हा : एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स ( संपर्क १८००२६६०७०० ०२२६२३४६२३४)
• बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव जिल्हा : भारतीय कृषी विमा कंपनी (संपर्क १८००४१९५००४, ०२२६१७१०९१२) "fruit crop insurance"
संत्रा, द्राक्षाला १४ जून, डाळिंबाला १४ जुलैपर्यंत मुदत विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय
पीक विमा योजनेच्या https://pmfby. gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अर्ज भरण्यासाठी बँका, वित्तीय संस्था, ई-सेवा | केंद्रांची मदत घेता येईल. अंतिम मुदत संत्रा, पेरू, , लिंबू, द्राक्षासाठी १४ जूनपर्यंत आहे. मोसंबी व चिकूसाठी ३० जूनपर्यंत, तसेच डाळिंबासाठी १४ जुलैपर्यंत, तर सीताफळासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. (fruit crop insurance)
0 Comments
DONT ANY SPAM COMMENT